Aligarh। आजपर्यंत हुंड्यामुळे लग्नं मोडल्याच्या असंख्य घटना आपण पाहिल्या आहे. अलीकडे एखाद्या क्षुल्लक कारणावरून लग्नं मोडल्याची प्रकरणंदेखील पाहायला मिळाली आहे. कधी लग्नात आईसक्रीम, पनीर किंवा गुलाबजामूनवरून भांडण झाल्याची घटना घडल्या आहेत. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये पाहायला मिळालं आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका लग्न समारंभात रसगुल्ला संपल्याची अफवा पसरली. रसगुल्ला संपल्यामुळे लग्न मंडपात नातेवाईक संतापले, त्यांच्या रसगुल्ला संपल्यामुळे कड्याक्याची भांडण झाली. वर आणि वधू दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर जोरदार मारामारी झाली. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा व्हिडिओ सासनीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजपुरा येथील आशु गार्डन मॅरेज होमशी संबंधित आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘लग्न मंडपात कार्यक्रम सुरू होता. यावेळी कोणीतरी रसगुल्ला संपल्याची अफवा पसरवली. यावरून कुटुंबीयांमध्ये भांडण झाले. काही वेळातच हाणामारी इतकी वाढली की, दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. त्यात महिलांचाही सहभाग होता. लोकांनी खुर्च्या फेकायला सुरुवात केली.’
वधूचा भाऊ आणि वहिनी यांच्यात आधीपासून काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पती-पत्नी दोघेही वेगळे राहतात. नवरा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. ही बाब पत्नी व भावांना समजताच दोन्ही बाजूचे लोक तेथे समोरासमोर आले.
आधी बाचाबाची झाली, नंतर हाणामारी झाली. लोकांनी खुर्च्या फेकायला सुरुवात केली. नंतर दोन्ही बाजूंच्या काही लोकांनी आपसात समज देत प्रकरण मिटवले, त्यामुळे दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
याप्रकरणी डीएसपी म्हणाले …
या संदर्भात डीएसपी अभय कुमार पांडे यांनी सांगितले की, ‘सासनी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आशु गार्डन मॅरेज होमशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्न समारंभात काही गोष्टींवरून दोन पक्षांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. समस्या. घडली. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र बसून या प्रकरणावर तोडगा काढला आहे. पोलिसात तक्रार केलेली नाही.’
हेही वाचा :