बाकू :- भारताचा स्टार नेमबाज अखिल शेरॉन याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत अफलातून कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्रॉंझपदक पटकावले व पॅरिसचा कोटा मिळवला. याच प्रकारात स्वप्नील कुसळे यानेही पात्रता प्राप्त केली.
अखिलच्या कामगिरीमुळे भारताला दोन पदके मिळवता आली. त्याने प्रथम ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व नीरजकुमार यांच्या साथीने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. तसेच त्याने वैयक्तिक गटातही ब्रॉंझपदकाचा वेध घेतला.
मनू भाकर, रिदम सांगवान, इशा सिंग या भारताच्या महिला तिरदांजांनी 1744 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने एकूण सहा पदकांसह दुसरे स्थान मिळवले आहे.
यामध्ये तीन सुवर्ण व तीन ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता भारताच्या पाच खेळाडूंनी या प्रकारात पात्रता मिळवली