नवी दिल्ली – पाकिस्तानचे एअरस्पेस बंद असल्याने एअर इंडियाला 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांची अनेक एअरस्पेस बंद ठेवली होती. यामुळे युरोप, आखाती देश आणि अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना जवळचा मार्ग बदलून वळसा घेऊन जावे लागत होते.
14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने एअर स्ट्राईक करत बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने आपले सगळे एअरस्पेस बंद केले. यामुळे एअर इंडियाच्या विमानांना रोज लांबच्या मार्गाने जावे लागत होते.