Air India case Praful Patel BJP : एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या विलिनीकरणाचा निर्णय मनमोहनसिंग सरकारने घेतला होता. त्या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याची चौकशी सीबीआयकडे सादर करण्यात आली होती. परंतु आता मात्र इतक्या वर्षांच्या चौकशीनंतरही त्यात काहीही गैरव्यवहार आढळला नसल्याचे कारण देऊन सीबीआयने क्लोजर रिपोर्ट देऊन हे प्रकरण बंद केले आहे. त्यामुळे आता भाजपने खोट्या आरोपाबद्दल मनमोहनसिंग यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स या कंपनीचे विलिनीकरण झाल्यानंतर एनएसीआयएल ही नवीन कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने विमानांच्या लिजींगचा जो व्यवहार केला त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा भाजपचा आरोप होता. व त्यात तत्कालिन विमान वाहतूक खात्याचे मंत्री प्रफुल्ल पटेल हे दोषी असल्याचा आरोप भाजपने केला होता. | Air India case Praful Patel
याच्या चौकशीचे काम सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. पण दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेल हे भाजप बरोबर गेल्याने सीबीआयने नुकतेच त्यांच्या विरोधातील हे प्रकरण दप्तरी दाखल केले आहे. या व्यवहारात काहीही गैर झाले नसल्याचा निर्वाळाही सीबीआयने आपल्या अहवालात दिला आहे. त्याचा दाखला देत संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले की या विषयावरून भाजपने मोठाच हल्लागुल्ला केला होता. आता ते म्हणतात यात चुकीचे काहीही घडले नाही, त्यामुळे भाजपने आता मनमोहन सिंग सरकारची माफी मागितली पाहिजे. | Air India case Praful Patel
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आम्ही तिन्ही पक्षांचे नेते या निवडणुकीत एकत्रित प्रचार करणार असून येत्या ३ एप्रिलला या संबंधात तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक शिवसेनेच्या मुख्यालयात होईल अशी माहितीही राऊत यांनी यावेळी दिली. | Air India case Praful Patel
उदयनराजेंना महायुतीने डावलल्यास तुम्ही तिकीट देणार का ? शरद पवार कॉलर उडवत म्हणाले..
काँग्रेसचं ठरलं ! वाराणसीत PM मोदींच्या विरोधात ‘हा’ नेता लढणार निवडणूक