वैष्णवी कदम
नगर – एक खेडे असल्याची ओळख उड्डाणपुलामुळे पुसली जात असताना नगर आता धुळीचे शहर झाले आहे. नगर शहरांतर्गत असलेल्या सर्व रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्याने व दुरुस्ती केल्यानंतर रस्त्यांवर खडी टाकल्यामुळे नगरकरांना खड्ड्यांबरोबरच धुळीने नकोसे केले आहे.पावसामुळे महापालिकेने रस्त्यावर खडी टाकलेली देखील वाहून गेली आहे. रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्याने व दुरुस्ती केल्यानंतर रस्त्यांवर खडी टाकल्यामुळे नगरकरांना खड्ड्यांबरोबरच धुळीने नकोसे केले आहे.
नगर शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून वाहने चालवताना नगरकरांचा जीव मेटाकोटीस आला असताना धुळीने नगरकरांना हैराण केले आहे. शहरातील ताराकपूर ते मिस्कीन मळा तसेच आकाशवाणी केंद्र ते माउली संकुल, कापड बाजार, अन्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहने काढताना नगरकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे धूळ यामुळे नगरकर पुरते त्रस्त झाले आहेत. शहरात धुळीमुळे अनेक जण नाकाला रुमाल लावून दुचाकी वाहने चालवताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे धुळी मुळे काही अंशी संसर्गजन्य आजारात देखील वाढ झाल्याचे दिसते. एकीकडे प्रशासन खड्डे बुजवत असताना दुसरीकडे डांबरीकरण केल्यानंतर टाकलेल्या खडीमुळे धूळ उडताना दिसत आहे. ही धूळ नगरकरांसाठी डोकेदुखीची ठरली आहे.रहदारीच्या बेशिस्तीमुळेर् रस्त्यामुळे नागरिकांचे जीवन हे अत्यंत त्रासदायक आहे
रस्त्याच्या कडेला हॉटेल आहे. आमचे धुळीमुळे आम्ही वैतागलो आहे महापालिका काही काम करत नाही खोकला, सर्दी ङोळे दुखी अनेक त्रास होत. धूळ हॉटेल पसरते सारखं पुसावर लागते. रस्त्यावरील दगड उडून हॉटेल मध्ये येतात, या त्रासाला आम्ही वैतागलो आहे.
सादिक शेख, नागरिक
आकाशवाणी तर माउली संकुल पर्यंतचा रस्त्याचं पंचिंग केलं आहे. पाऊस उघड्यामुळे त्या रस्त्यावर कार्पेट करू तारकपूरला पुलाचा काम लवकर सुरु होईल, पुलाच काम झाल्यावर कार्पेट करू शहरातील रस्त्याचे पंचिंग केल्यावर धुळीची समस्या दूर होईल.
मनोज पारखी, शहर अभियंता