Inidan navy officer। भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारच्या तुरुंगात बंद असलेल्या आठ माजी भारतीय खलाशांची सुटका करण्यात आलीय. आता सुटका करण्यात आलेल्या ८ पैकी ७ माजी नौसैनिक त्यांच्या देशात परतले आहेत. कतारहून परतलेल्या माजी नौसैनिकांनी मायदेशी पाऊल ठेवताच भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. तसेच [पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
पंतप्रधानांशिवाय आमची सुटका अशक्य Inidan navy officer।
कतारहून भारतात परतलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय आम्हाला परत येणे शक्य नव्हते. भारत सरकारने आमच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न केले. कतारहून परतलेल्या नौदल सैनिक,”आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. असे म्हटले. मोदींच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारशी त्यांचे समीकरण जुळल्याशिवाय हे शक्य झाले नसते. भारत सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. त्यांच्या प्रयत्नांशिवाय हा दिवस आम्हाला दिसला नसता.
परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आनंद Inidan navy officer।
“कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. या आठ जणांपैकी सात जण भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका आणि घरी परतण्यासाठी कतारच्या अमीर शेख यांच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो,”असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली Inidan navy officer।
या आठही माजी भारतीय सैनिकांना ऑगस्ट २०२२ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी कतारी न्यायालयाने या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारत सरकारने नागरिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अखेर भारतीय कूटनीतीचा विजय होऊन भारतीय नौसैनिकांची सुटका झाली.