नवी दिल्ली – अग्निपथ योजनेवरून युवकांमध्ये निर्माण झालेली संतापाची भावना कमी करण्यासाठी केंद्र सरकार कामाला लागले असून त्यांनी त्यानुसार गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे.
संरक्षण मंत्रालयातील नोकर भरतीत अग्निवीरांना दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मान्यता दिली आहे. तसेच दुसरीकडे गृहमंत्रालयानेही काही निमलष्करी दलांमध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के जागांचे आरक्षण जाहीर केले आहे.
सीएपीएफ आणि आसाम रायफल या दलांमध्ये भरतीसाठी हे आरक्षण लागू होणार आहे. अग्निपथ योजनेमुळे युवकांची पुर्णवेळ पेन्शनेबल लष्करी भरतीचा हक्क डावलला गेला आहे असा आंदोलनकारी युवकांचा आक्षेप आहे. त्या आक्षेपावर हा तोडगा सरकारने काढला असला तरी तो युवकांना कितपत मान्य होईल हे पहावे लागणार आहे.