नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मॉब लिंचिंगसोबतच देशातील सर्वच हिंसाचाराच्या विरोधात आहे. तसेच जर एखादा स्वयंसेवक लिंचिंगच्या घटनेत दोषी आढळला तर त्याला संघातून बाहेर काढण्यासाठी आम्ही वेळ घालवणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. आरएसएसला जाणून घ्या या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी परदेशी माध्यमांशी काश्मीर, हिंदु राष्ट्र, हिंदुत्व,मॉब लिंचिंग आणि एनआरसी यावर उघडपणे संघाची भूमिका स्पष्ट केली.
मोहन भागवत यांनी यावेळी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून वर्णन केले आणि जमाव हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. तसेच देशातील जमाव बंदी थांबवण्यासाठी स्वयंसेवकांनीही सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन, इटली, नेपाळ यासह 30 देशांमधील पत्रकारांनी संघ प्रमुखांना प्रश्न विचारले. कार्यक्रमात भैय्याजी जोशी, सरकार्यवाह मनमोहन वैद्य, डॉ. कृष्णा गोपाल, उत्तर विभाग संघटक बजरंग लाल गुप्ता, दिल्ली प्रांत संघ चालक कुलभूषण आहुजा उपस्थित होते. दरम्यान, कलम 370 रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना भागवत यांनी, आता देशातील काश्मिरींचे अंतर कमी होईल. सुरुवातीला काश्मिरींना वेगळे करण्याचा प्रयत्न झाला होता. यासंदर्भात ठराव संसदेमध्ये बऱ्याच वेळा मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे काश्मिरींनी नोकरी व जमीन गमावण्याची भीती बाळगू नये. काश्मीरचे लोक देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. खऱ्या अर्थाने आपण विकासाचे भागीदार व्हाल असे त्यांनी म्हटले. एवढेच नाही तर पाक अधिकृत काश्मीर हादेखील भारताचा एक भाग असल्याचेही भागवत यांनी म्हटले. तसेच राम मंदिर ही केवळ कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा पूजेशी संबंधित नाही. भगवान राम या देशाच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म अयोध्येत झाला. त्याच्या जन्मस्थळावर मंदिर बांधणे आवश्यक असल्याचेही भागवत यांनी यावेळी म्हटले.