नगर,(प्रतिनिधी) – तब्बल १८ वर्षांनंतर शासनाने मनपाला १३४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी सात महिन्यांपूर्वी मान्यता दिली. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मनपाने टीसीएस कंपनीशी करार केला आहे. मात्र, या भरतीबाबत पुढे काहीच प्रक्रिया होत नसल्याने मनपाची भरती प्रक्रिया अडकली कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिकेचा आस्थापना खर्च ७० टक्क्यांच्या पुढे गेल्याने एकूण उत्पन्न आणि खर्च, याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शासनाकडून नवीन पदभरतीला मान्यता मिळत नव्हती. मात्र, रिक्त जागांची वाढती संख्या, कामाचा ताण आदींमुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन विभागांचा परिणाम होत आहे.
मनपाच्या आकृतीबंधात २८०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात कार्यरत १६०० आहे. अशा स्थितीत शासनाकडून अवघ्या १३४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया कधी होणार, असा प्रश्न आहे. पुढील महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता काळात मनपाला भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध येणार नाही. त्यामुळे भरती लांबणीवर पडणार आहे.
या पदांची होणार भरती
स्त्रीरोगतज्च ११, भूजलतज्ज्ञ १. पर्यावरण संवर्धन अधिकारी २. कनिष्ठ अभियंता २. अभियांत्रिकी सहायक ८ आरेखक असिस्टंट १. संगणक प्रोग्रॅमर १, विद्युत पर्यवेक्षक ३. पाणी लॅब टेक्निशियन ६, लॅब टेक्निशियन १, लॅब असिस्टंट ६, प्रदूषण नियंत्रण अधिकारी १. पशुधन पर्यवेक्षक १, लघुटंकलेखक २. कनिष्ठ विधी: अधिकारी २. समाजविकास अधिकारी १, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर १२, सब ऑफिसर १. चालक २०, फायरमन ५०, लिपिक १३.