मुंबई – नव्वदच्या दशकात अनेक बॉलिवूड जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अशीच एक जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडनची. अक्षय कुमार आणि रवीना टंडन 90 च्या दशकात अफेअरमुळे चांगलेच चर्चेत होते. गेल्या महिन्यात एका इव्हेंटसाठी दोघेही एका मंचावर दिसून आले होते. त्यानंतर आता रवीनाने एका मुलाखतीत अक्षय कुमारबाबत वक्तव्य केलं आहे. केवळ अक्षयच नाही तर तिने शिल्पा शेट्टी बाबत देखील भाष्य केलं आहे.
रवीना आणि अक्षयने ‘मोहरा’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘बारूद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. कामाच्या आघाडीवर, रवीना टंडन लवकरच संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्यासोबत आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘घुडचडी’ मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती ‘पटना शुक्ला’मध्ये देखील दिसणार आहे.मात्र त्या आधी तिने एका मुलाखतीत अक्षय कुमार बाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे.
सिनेसृष्टीपासून दूर गेलेल्या रवीनाने केजीएफ या साऊथ चित्रपटातून दमदार कमबॅक केला. नुकतंच तिने एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. रवीना यावेळी म्हणाली, ‘अक्षय आणि मी अजूनही मित्र आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रवास असतो. तुम्हाला त्याचा आदर करून पुढे जाण्याची गरज आहे. मी अक्षयबद्दल खूप विचार करते. मला वाटते की तो इंडस्ट्रीतील टॅलेंटेड व्यक्तींपैकी एक आहे.”
शिल्पासोबतच्या मैत्रीबद्दल विचारले असता रवीना म्हणाली की, आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला एकत्र बांधतात. असे अनेक अनुभव आहेत ज्यांनी आम्हाला एकत्र बांधले आहे. शमिता आणि शिल्पा या दोघेही माझे पती अनिल थडानी यांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत.असंही रवीनाने यावेळी स्पष्ट केलं.
या महिन्याच्या सुरुवातीला रवीनाने अक्षयला मुंबईत स्टाईल अवॉर्ड प्रदान केला आणि दोघांनी एकाच स्टेजवर दिसले होते. यापूर्वी एका मुलाखतीत रवीनाने अक्षयसोबतच्या तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल सांगितले होते. “मोहराच्या काळात आम्ही हिट जोडी होतो आणि आताही आम्ही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भिडतो, गप्पा मारतो. असं रविना म्हणाली होती.