पोलीस निरीक्षक खराडे यांचा इशारा
मंचर- आंबेगाव विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. व्हॉटसअप, फेसबुक व इतर सोशल मीडियावर सायबर विभाग, पुणे ग्रामीण विशेष लक्ष ठेवून आहे. आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, लाईक करणारे व फॉरवर्ड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला आहे.
पोलीस निरीक्षक खराडे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात कोणत्याही वैयक्तीक, सामाजिक व धार्मिक बाबी संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य जनतेला सोशल मीडियामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.