Acharya Pramod Krishnam । काही दिवसापूर्वी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी “जोपर्यंत काँग्रेसमध्ये राहुल गांधी आहेत, तोपर्यंत पक्षाला कोणीही वाचवू शकत नाही, असे म्हणत काँग्रेसवर टीका केलीय.
“महात्मा गांधींचा आत्मा रडत असेल..” Acharya Pramod Krishnam ।
आचार्य प्रमोद कृष्णम हे उत्तर प्रदेशातील संभलमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी, “महात्मा गांधींचा आत्मा रडत असेल कारण सर्व विरोधी पक्ष त्यांच्या तत्त्वांविरुद्ध एकवटले आहेत.” ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देण्यापासून ते मागे हटणार नाहीत. भारतातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले. तसेच जोपर्यंत पक्षात राहुल गांधी आहेत तोपर्यंत पक्षाला कोणीही वाचवू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
प्रमोद कृष्णम यांनी यापूर्वीही अनेकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या बरबादीला राहुल गांधी जबाबदार असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले होते. जोपर्यंत ते (राहुल गांधी) आहेत तोपर्यंत काँग्रेसला काहीही होणार नाही. कृष्णम यांनी दावा केला होता की, भाजपच्या विरोधात एकजूट झालेली विरोधी आघाडी ‘इंडिया’ लोकसभा निवडणुकीत पराभूत होईल.
आचार्य प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी Acharya Pramod Krishnam ।
आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पक्षविरोधी वक्तव्यामुळे काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रस्ताव फेटाळून लावलाय. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर ही कारवाई अशा वेळी करण्यात आली जेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना “श्री कल्की धाम” च्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित केले होते.