– हिमांशू
‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरङ्गलं उचलणार नाही,’ असं सांगणार्या लोकमान्य टिळकांची शालेय जीवनातील कहाणी सर्वज्ञात आहे. आज, उत्तर आधुनिक युगात अशा बाणेदारपणाला ङ्गारसं महत्त्व दिलं जात नसलं आणि बाण्याला तिलांजली देणार्यांची भौतिक प्रगती अधिक वेगानं होत असली, तरी असे बाणेदार लोक आजही जगाच्या पाठीवर कुठे कुठे आढळतात. अहो, जगाचं काय घेऊन बसलात? जगाबाहेर अंतरिक्षातसुद्धा जेव्हा असा बाणेदारपणा बघायला मिळतो तेव्हा मन भरून आल्यावाचून राहात नाही. किंबहुना, इतरांनी खाल्लेल्या शेंगांची टरङ्गलं ‘जी हुजूर’ म्हणून उचलणार्यांनी आणि त्यायोगे पदरात काहीतरी पाडून घेणार्यांनी पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापलेला असताना असा बाणेदारपणा ङ्गक्त अंतरिक्षातच दाखवणं शक्य आहे, असंही वाटत राहतं.
काही दिवसांपूर्वी आपल्याकडे टोमॅटोच्या भरमसाठ दरवाढीनं लोकांचे डोळे पांढरे केले होते; पण तरी एखादा टोमॅटो कुठे पडला, हरवला किंवा कुणी चोरून खाल्ला म्हणून ङ्गारसं काही बिघडणार नाही. मग अमेरिकेसारख्या मोठ्या देशाला एखादा टोमॅटो नाहिसा होण्यानं काय ङ्गरक पडणार? पण अंतराळात सगळी गणितंच बदलतात ना! तिथं एखादा टोमॅटो नाहीसा होणं म्हणजे खूप मोठ्ठं नुकसान. एक तर तिथं प्रत्येक जिन्नस पुुरवून-पुरवून वापरावा लागतो. शिवाय नाहीसा झालेला जिन्नस कधी अचानक प्रकट होऊन कुणाला लागेल, याचा नेम नाही. पण हा टोमॅटो वेगळ्याच कारणानं गाजला.
अंतराळात वगैरे लोक शेती करतात, याचं आपल्यालाच नव्हे तर खुद्द शेती करणार्यालाही अप्रूप असतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मध्यंतरी चीनने भात पिकवून पाहिला. कुणी कोबी तर कुणी मुळा पिकवून पाहिला. अशाच प्रयोगातून ङ्ग्रँक रुबिओ नावाच्या अंतराळवीराने अंतराळ स्थानकात पिकवलेला हा टोमॅटो. रोपांना लगडल्यावर अभ्यासासाठी काही टोमॅटो तोडण्यात आले. उरलेले टोमॅटो अंतराळवीरांना वाटून दिले गेले. ङ्ग्रँकने त्याला मिळालेला टोमॅटो प्लॅस्टिक पिशवीत ठेवून दिला. काही दिवसांनी त्याने तिथून व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे पृथ्वीवरच्या शाळकरी मुलांशी संवाद साधला.
त्यांना दाखवण्यासाठी त्याने टोमॅटो शोधला; पण सापडलाच नाही. पुढचे सहा महिने तो टोमॅटो शोधत राहिला आणि त्याचे साथीदार त्याच्यावर टोमॅटो खाल्ल्याचा आरोप करत राहिले. ङ्ग्रँक मात्र ‘मी टोमॅटो खाल्ला नाही,’ असं बाणेदारपणानं सांगत राहिला. अखेर त्याचा अंतराळ स्थानकावरचा मुक्काम संपला आणि तो पृथ्वीवर आला. पण आपण सुखरूप पोहोचल्याच्या आनंदापेक्षा टोमॅटो खाल्ल्याचा आरोप खोडता आला नाही, याचं दुःखच ङ्ग्रँकला अधिक वाटत होतं. 371 दिवसांच्या अंतराळवारीचा आनंद एका टोमॅटोनं हिरावून घेतल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल!
अंतराळात ङ्गिरण्याच्या अद्वितीय अनुभवानंतर ‘जमिनीवर येणं’ म्हणजे काय, हे ङ्ग्रँकला पुरेपूर जाणवलं असेल. पण अंतरिक्षात त्यानं दाखवलेला बाणेदारपणा अगदीच व्यर्थ गेला नाही. तो ‘लँड’ झाल्यानंतर दोन महिन्यांनी, म्हणजे टोमॅटो हरवल्यानंतर आठ महिन्यांनी ‘वरून’ निरोप आला, की टोमॅटो सापडला. ‘टोमॅटो खाल्ल्याचा संशय आम्ही ङ्ग्रँकवर उगीचच घेतला,’ अशी खंत जास्मिन मोघबेली नावाच्या महिला अंतराळवीराने व्यक्त केली. हे सगळं वाचून प्रश्न पडला, मंत्रालयातल्या खुर्च्या आणि विधिमंडळातली बाकं अंतराळातून कशी दिसत असतील?