मुंबई – मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरू करण्यासंदर्भातील माहिती पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. मात्र मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरू होण्याच्या मुद्यावरून सर्व स्थरातून प्रतिक्रिया दिसून येत आहे. यातच याबाबत आता अमृता फडणवीस यांनी आपले मत माध्यमांशी बोलतांना मांडले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या,’नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणं आवश्यक आहे. ‘महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.