मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. अशात उद्धव ठाकरेंनी आपली पुढील रणनीतीचे संकेत दिलेले असताना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव देण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा धक्कादायक आरोप राऊत यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून संजय राऊत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. अशात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठे आरोप केले आहेत. ते म्हणाले,”ज्याप्रमाणे आमच्याकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण घेण्यात आले हे सत्य नाही.. न्याय नाही हा एक व्यवहार आणि व्यापार झाला आहे. आतापर्यंत यामध्ये तब्बल दोन हजार कोटींची मोठी लेनदेणं झाली आहे. हा माझा प्राथमिक अंदाज आहे. हा निर्णय विकत घेतलेला निर्णय आहे”. असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये यांचे ट्विट
किती घसरणार @rautsanjay61 ?
गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली एक आरोप ठोस सिध्द करू शकला नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो म्हणून इतकही हस करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे? https://t.co/DNJwU3HKDV— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 19, 2023