मुंबई – राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाटअसली तरी तिचा धोका कमी आहे. मात्र, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार बळावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नवीन आजारांनी सामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे. ज्या लोकांना आधीच काही आजार आहेत हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनामुक्त झालेल्यांना नव्या आजारात प्रामुख्याने थकवा जाणवणे, पाठदुखीची समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या तिसऱ्या लाटेत थकव्याबरोबरच निद्रानाशही होत आहे. पोटदुखी, पचनाचे आजार दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना पश्चात ओपीडी सुरु करण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे दैनंदिन जीवतात वावरत असतानां योग्य आहार – विहार आणि हलक्या व्यायामाची गरज आहे. दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा संभाळणे. सकाळी उठल्यावर आपल्या तब्येतीला झेपेल इतका व्यायाम करणे आवश्यक आहे. याच बरोबर दिवसभर चांगले सकारत्मक विचार केल्याने मन प्रसन्न राहते आणि या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आजार लवकर बरे होण्यास मदत होतेच, असे जाणकार सांगत आहेत .