नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आता काही दिलासादायक माहिती समोर येत आहे. देशातील करोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. सलग दुसर्या दिवशी देशात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे आढाळून आले आहे. देशात मागील २४ तासांत दोन लाखांहूनही कमी करोना रुग्ण आढळले.
गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन करोना रुग्ण आढळले. जे गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांनी करोनामुळे आपला जीवही गमावला आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.
India reports 1,73,790 new #COVID19 cases, 2,84,601 discharges & 3,617 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,77,29,247
Total discharges: 2,51,78,011
Death toll: 3,22,512
Active cases: 22,28,724Total vaccination: 20,89,02,445 pic.twitter.com/NgfUAOgz08
— ANI (@ANI) May 29, 2021
गेल्या एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या करोनाची एकूण २२,२८,७२४ सक्रिय प्रकरणे आहेत.
१२ एप्रिलनंतर नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र करोनामुळे मृत्यूंची संख्या सध्याही चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात १०,०२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये ४८६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच तामिळनाडूत ३१,००० नवीन करोना रुग्ण आढळले. तर कर्नाटकमध्ये २३,००० करोना बाधित आढळले.