लोणी धामणी-धामणी (ता. आंबेगाव) येथील सरपंच सागर जाधव यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक दानशूर व्यक्तिमत्व सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू त्याचप्रमाणे आर्थिक मदत दिली आहे. त्यामध्ये टीव्हीएस कंपनी (हरिता), बजाज अर्पण ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुनीत बालन ग्रुप पुणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नाम फाउंडेशन, परिवर्तन फाऊंडेशन यांनी धामणी गावांमध्ये तब्बल चारशेहून अधिक कुटुंबांना किराणा, अन्न धान्य, स्वरूपामध्ये वस्तू वाटप केले आहेत.
रविवारी (दि. 3) सिद्धार्थ मित्र मंडळाने दरवर्षी धूम धडाक्यात होणारी पिरसाहेब यात्रा रद्द करून मंडळाच्या वतीने 35 कुटुंबांना वेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. यामध्ये विशेषतः प्रत्येक कुटुंबाला दोन डझन अंडी देण्यात आली.