मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी जोरदार खडाजंगी सकाळी विधिमंडळात पहायला मिळाली. त्यानंतर दुपारी चक्क आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा बार सरकार उडवायला तयार असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी मारली. तेव्हा विधानसभेत अक्षरशः हास्याचे फवारे उडाले. त्याला आदित्य यांनी अतिशय सजगतेने उत्तर देत ही प्रेमळ धमकी तर नाही, ना असा सवाल केला. तेव्हा फडणवीसांनी आपल्या अनुभवाचे बोल सांगताच अनेकांना बाके बडवण्याचा मोह आवरला नाही. यासह विधानपरिषदेत सिमावर्ती भागातील नागरिकांचा 54 कोटींचा निधी रोखल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा यावेळी विरोधकांचा निषेध करण्यात आला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मराठी जनतेच्या विकासाठी मंजुर केलेल्या 54 कोटी रुपयांच्या मदतीला रोखण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतला आहे. त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत पाहायला मिळाले. कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर विधानपरिषदेचे कामकाज उपसभापती निलम गोऱ्हे 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
अजित पवारांचा संताप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला. मंत्री भुसेंनी शरद पवारांचे नाव घेण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने माफी मागावी नाही तर आम्ही सभागृहातून वॉकआउट करू, अशा इशारा पवारांनी दिल्यानंतर भुसेंनी याप्रकरणी स्पष्टीकरण देत वादावर पडता टाकला.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा- दानवे
छत्रपती संभाजीनगर शहरात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात ईडी चौकशी सुरू झालीय. परंतु घरकुल योजनेतील घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांची चौकशी कधी होणार आहे?, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.