नाशिक : करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, कलाकार आणि खेळा़डू पुढे सरसावले असताना आता या लढ्यात मैदानात उतरण्याचा शेतक-यांने सुध्दा निर्णय घेतला आहे.
नाशिक येथील एका गरीब शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांपैकी एका एकरात पिकवलेला गहू गरजू व्यक्तींसाठी देण्याच्या निर्णय घेतलाय. निफाड तालुक्यातील सुकण्याच्या दत्ता पाटील यांनी त्यांच्या शेतातील गव्हाची रास गावातील गोरगरीब व हातवर पोट असणा-या मजुरांना खुली करून दिली आहे. दत्ताराम हे सपत्नीक आपल्या शेतात उभं राहून गरजूंना गव्हाच वाटप करत आहे.
Maharashtra: A farmer from Nashik is distributing wheat harvested from 1 acre of his 3-acre land to needy.Datta Ram Patil says,"I am a small farmer.We're not financially stable but if we have 1 chapatti then we can give half to others who are in dire need". #CoronaLockdown (28.3) pic.twitter.com/lesfKF0Js3
— ANI (@ANI) March 29, 2020
दत्ताराम पाटील म्हणतात, ” आम्ही काही आर्थिकदृष्ट्या फार संपन्न नाही, पण आमच्याकडे एक चपात्ती असेल असेल तर त्यातील अर्धी गरजूंना देऊ शकतो.”
त्यांच्या या निर्णयानंतर त्यांचे राज्यात सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. त्यांचा हा दृष्टीकोन पाहून अनेकजण मदतीसाठी पुढे येतील हे निश्चित आहे.