मुंबई – देशावरील करुणा संकटाचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये बुधवारपासून 21 दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सध्या बंद आहेत. देशभरातील या लॉक डाऊन’मुळे तळीरामांची मोठी गैरसोय होत असून काही ठिकाणी तर दारू न मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. अशातच आता दारू न मिळाल्याने हैराण असलेल्यांसाठी अभिनेता ऋषी कपूर धावून आलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लॉक डाऊनच्या काळात बंद असलेली दारूची दुकाने सुरू करायला हवीत असं मत अभिनेता ऋषी कपूर याने व्यक्त केलं आहे. याबाबत त्याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत ही भूमिका मांडली होती. दरम्यान ऋषी कपूर याच्या या मागणीमुळे नेटकरी त्याच्यावर चांगलेच खवळले असून आपल्या ट्विटमुळे सतत कॉन्ट्रोव्हर्सीच्या गर्तेत अडकणारा ऋषी कपूर यात ट्विटरने देखील चर्चेचा विषय बनला आहे.