तिरूचिरापल्ली (केरळा) : भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याची चार जणांच्या टोळीने सोमवारी हत्या कलेली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असण्याची शक्यता आहे.
विजया रघू (वय 40) या कार्यकर्त्याला चौघांनी घेरले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
एका चोरीच्या प्रकरणात रघू याचे बाबू नावाच्या व्यक्तीशी वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातून हा हल्ला घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी तातडीने मारेकऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको केला. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी रघू यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.