मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. 5 मे 2018 मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी त्यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असून पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
दरम्यान, या अटकेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही अर्णब यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सुद्धा ट्विटवरून आपले मत व्यक्त केले आहे. “न्याय नीती सोडून अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरणाऱ्यांनो तयार रहा… भीमाची गदा निश्चित हिशोब चुकते करेल, जेव्हा कुरुक्षेत्रात मांड्या फुटतील तेव्हा बांगड्या फोडू नका…” असं भातखळकर म्हणाले.
न्याय नीती सोडून अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरणाऱ्यांनो तयार रहा… भीमाची गदा निश्चित हिशोब चुकते करेल, जेव्हा कुरुक्षेत्रात मांड्या फुटतील तेव्हा बांगड्या फोडू नका…#ArnabWeAreWithYou
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 4, 2020
तसेच अतुल भातखळकर पुढे म्हणाले कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामीना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार..” असं म्हणत भातखळकर यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामीना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार.. pic.twitter.com/oka6mhPZZe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 4, 2020