चंदीगड – केंद्र सरकारने सीमेवरील तैनात लष्करासाठी सामग्री घेऊन जाणाऱ्या मालगाड्या त्वरीत पाठवाव्यात, या मालाच्या पुरवठ्या अभावी तेथील लष्करी जवानांचे मोठे हाल होऊ शकतात.
तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या मालाची तेथे मोठ्याप्रमाणात टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे यादृष्टीने त्वरीत हालचाल सुरू करण्याची सुचना आपल्या सरकारला करा अशी सूचना करणारे पत्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांना पाठवले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे या मालगाड्या केंद्र सरकारने थांबवल्या होत्या. पण आता शेतकऱ्यांनी या मालगाड्यांच्या वाहतुकीला मोकळीक दिली आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनाला आणून द्या अशी सुचनाही कॅ अमरिंदरसिंग यांनी नढ्ढा यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.