सोलापूर – परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक नेते पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगली (बु) या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहिले. पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘केंद्र सरकार राज्य सरकारपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून दारूडे आहेत, त्यांनी देश विकायला काढला.’ असं वादग्रस्त वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.