पुणे – पुण्यातील जनता वसाहतीतील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली असून तब्बल 40 घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे. पाण्याचे लोट थेट नागरिकांच्या घरात शिरला असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त झाले आहेत.