नवी दिल्ली- काढा पिण्यामुळे शरीर निरोगी राहते, त्यामुळे याचे आजन्म सेवन केले जाऊ शकते. जर एखादया व्यक्तीला यकृताच्या समस्या उद्भवल्या असतील तर, काढा तयार करताना कोणत्या गोष्टी किती प्रमाणात वापरल्या आहेत त्यावर ते अवलंबून आहे. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व वस्तू घरात अन्न शिजवताना वापरल्या जातात, असं स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत वाचनात येत होते किंवा कानावर पडत होते की, जर दीर्घकाळापर्यंत काढ्याचे सेवन केले तर ते शरीरास इजा पोहोचवू शकते. विशेषत: यकृतावर (Liver) त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता आयुष मंत्रालयाने (AYUSH Ministry) स्पष्ट केले आहे की, काढा पिण्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. त्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ‘काढा’ या गोष्टीने फार महत्वाची भूमिका बजावली आहे. घरगुती काढ्यासोबतच बाजारात अनेक कंपन्यांनी आपले काढे शर्यतीमध्ये उतरवले आहेत.