Lok Sabha Election 2024 । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. निवडणुकीचे निकाल आल्यावर आपणच जिंकू असा दावा दोन्ही आघाड्या करत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक निकालांबाबत मोठा दावा केला आहे.
बाणगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले
‘चार टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील 380 जागांसाठीची निवडणूक पूर्ण झाली आहे. या 380 लोकसभा जागांपैकी भाजपने 270 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला. अमित शाह पुढे म्हणाले की, आता लढा ४०० पार करण्याची आहे’
भाजप उमेदवारासाठी मते मागताना अमित शहा यांनी बंगालच्या जनतेला राज्यात भाजपला तीसपेक्षा जास्त जागा देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘जर भाजपने राज्यात इतक्या जागा जिंकल्या तर त्यांचे उमेदवार शंतनू ठाकूर आणि भाजप मतुआ समाजाच्या लोकांपर्यंत घरोघरी जाऊन CAA अंतर्गत नागरिकत्व मिळवतील.’
‘रोहिंग्या आणि बांगलादेशी टीएमसीची व्होट बँक’
यानंतर पश्चिम बंगालमधील उलुबेरिया येथे एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी टीएमसीवर आरोप केला ते म्हणाले, ‘रोहिंग्या आणि बांगलादेशी हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या व्होट बँक आहेत. ते म्हणाले की, ममता सरकारने केंद्राच्या अनुदानित योजनांची नावे बदलली आणि त्यांना बंगाल सरकारच्या पुढाकाराने चालवले.’
हे वाचाल का ?“मविआच्या काळातही उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची गुप्त भेट..” ; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा