शारजा – सलामीवीर क्विटंन डी काॅक याच्या अर्धशतकी आणि क्रुणाल पांड्या याने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवलं आहे. मुंबईने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 208 धावांची मजल मारली आहे.
Sharjah does a Sharjah.
MI – 208/5 (20)
🎯 209 runs to chase.#MIvSRH #OrangeArmy #KeepRising
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 4, 2020
सलामीवीर रोहित शर्मा 6(5) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर क्विटंन डी काॅकने मुंबईचा डाव सावरला. क्विटंन डी काॅकने 39 चेंडूत (4 षटकार आणि 4 चौकार) सर्वाधिक 67 धावांची खेळी केली.याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 27(18), ईशान किशनने 31(23), हार्दिक पांड्याने 28(19) धावांची खेळी केली. तर कॅरन पोलार्डने 13 चेंडूत (3 षटकार) नाबाद 25 आणि क्रुणाल पांड्याने 4 चेंडूत (2 षटकार व 2 चौकार) 20 धावांची खेळी केली.