कोल्हापूर – राज्यसभेत कृषी क्षेत्राशी संबंधीत विधेयक मंजूर झाले. या विधेयकांना विरोध केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विधेयकांवर टीका केली आहे. पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल. पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत आणि तुमच्या काचा आहेत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी म्हणाल शेतीला कॉर्पोरेटच्या तावडीत देण्याचा प्रयत्न विविध पक्षांना हाताशी धरून केला आहे. पण, शेतमालाला हमी भाव मिळवणे हा शेतकऱ्याचा जन्म सिद्ध हक्क आहे. त्यासाठी प्रसंगी शेतकरी हातात दगड घेईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेती सुधारणा विधेयकाबद्दल शेट्टी यांनी एक व्हिडिओ जारी करून हा इशारा दिला आहे.