जुन्नर/नारायणगाव -यंदा पाऊस कोसळत आहे पण समाधानकार नसल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिल्याने जुन्नरकरांची चिंता वाढली आहे. सध्या प्रकल्पात 56.70 टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 34.64 टक्के कमीसाठा झाला असल्याची माहिती कुकडी पाटबंबंधारे विभागाचे क्र. 1चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या या कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 91.34 टक्के पाणीसाठा होता.
दरम्यान, पूरनियंत्रण करण्याकामी वडज धरणातून 901 क्युसेकने मीना नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याचे कडूसकर यांनी सांगितले. तर चिल्हेवाडी धरणातून 1448 क्युसेकने विसर्ग गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे.