नवी दिल्ली – आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भारताच्या नेमबाजी संघाचे सराव शिबिर शनिवारपासून सुरू होणार होते. मात्र, राजधानीत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने हे शिबिर रद्द करण्यात आले होते.
आता येत्या दोन आठवड्यांत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतरच शिबिराच्या आयोजनाचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, असे भारतीय नेमबाजी संघटनेने म्हटले आहे.
नेमबाजी प्रशिक्षकाला करोनाची बाधा झाल्यामुळे हे शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिरात खेळाडू तसेच प्रशिक्षक यांची चाचणी केली जाणार असून त्यानंतर संघटना शिबिराबाबत लवकरच निर्णय घेईल, असेही सांगण्यात येत आहे.