गुवाहाटी – आसाममधील पुरस्थिती अधिक गंभीर झाली असून 27 जिल्हयांमधील सुमारे 26 लाख 38 हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे. तसेच मोरीगाव जिल्हयात आज आणखी एकाचा बळी गेला असून आतापर्यत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. यात भूस्खलनात 26 जण ठार झाले आहेत. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर भारतात काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने ब्रम्हपुत्रा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे आसाममधील गोलपारा जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले असून 4 लाख 70 हजार नागरिक पुरग्रस्त झाले आहेत. यापाठोपाठ बारपेटा, गुवाहाटी, तेजपूर आदी शहरांनाही पुराने वेढा दिलेला आहे.
राज्य सरकारकडून 564 रिफिल कॅम्प उभारण्यात आले असून यात 47 हजार 772 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्यापही पुरग्रस्त भागात शेकडे जण अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.