नवी दिल्ली – लोकसभा तसेच विधानसभांच्या काही जागांसाठी होणारी पोटनिवडणूक 7 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. देशात करोनाची साथ आणि काही राज्यातली पूरपरिस्थिती यामुळे हा निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे. देशातली परिस्थिती सामान्य होताच या निवडणुका घेतल्या जातील.
बिहारमध्ये वाल्मिकीनगर येथे लोकसभेची निवडणूक होणार होती. त्याबरोबर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि आसाम, मध्य प्रदेश आणि केरळमधील प्रत्येकी एक विधानसभा जागेवर पोटनिवडणूक होणार होती. यापैकी बहुतेक ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.