लखनौ – राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेल्या सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी काँग्रेसने पायलट यांच्या बंडामागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप करण्यात आला असून भाजपने या आरोपांचे खंडन केले आहे.
अशातच आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘सरकारमधील अस्थिरता पाहता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी.’ अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा : गेहलोत सरकारमध्ये रंगलेल्या राजकीय नाट्याबाबत वसुंधरा राजेंचे ट्विट; म्हणाल्या…
याबाबतची भूमिका त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मांडली असून, “मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्ष बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन करत बसपा आमदारांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतलं. एवढंच नव्हे तर राजस्थान सरकारने फोन टॅपिंग करण्याचे बेकायदेशीर व असंविधानिक कृत्य देखील केलं आहे.” असा गंभीर आरोप केला आहे.
1. जैसाकि विदित है कि राजस्थान के मुख्यमंत्री श्री गहलोत ने पहले दल-बदल कानून का खुला उल्लंघन व बीएसपी के साथ लगातार दूसरी बार दगाबाजी करके पार्टी के विधायकों को कांग्रेस में शामिल कराया और अब जग-जाहिर तौर पर फोन टेप कराके इन्होंने एक और गैर-कानूनी व असंवैधानिक काम किया है। 1/2
— Mayawati (@Mayawati) July 18, 2020
“राजस्थानच्या राज्यपालांनी राज्यातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी. यामुळे राज्यातील लोकशाहीची आणखी हानी होणं टाळता येईल.” असं देखील त्या म्हणाल्या.
2. इस प्रकार, राजस्थान में लगातार जारी राजनीतिक गतिरोध, आपसी उठा-पठक व सरकारी अस्थिरता के हालात का वहाँ के राज्यपाल को प्रभावी संज्ञान लेकर वहाँ राज्य में राष्ट्रपति शासन लगाने की सिफारिश करनी चाहिए, ताकि राज्य में लोकतंत्र की और ज्यादा दुर्दशा न हो। 2/2
— Mayawati (@Mayawati) July 18, 2020