जयपूर – पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानात सुरु झालेलं राजकीय नाट्य अद्याप सुरूच आहे. राज्यातील लोकनियुक्त काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने हे कारस्थान रचल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात योतोय. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून या राजकीय घडामोडींसाठी काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचं म्हटलंय.
अशातच आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी राजस्थानातील राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलहाचा फटका राज्यातील नागरिकांना बसत असल्याचा आरोप लगावला आहे.
ट्विटरद्वारे आपली भूमिका मांडताना त्या म्हणतात, “राज्यामध्ये आतापर्यंत ५०० हुन अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २८ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. टोळधाडीने शेतकरी हैराण आहे. महिलांवरील अत्याचार वाढतायेत. विजेची समस्या आहे. मात्र सत्ताधारी पक्ष भाजप व भाजप नेत्यांवर आरोप लावण्यात मशगुल आहे. कधीतरी जनतेचा विचार करा.’
#RajasthanFirst pic.twitter.com/Qzq1iv0Yuy
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) July 18, 2020
तत्पूर्वी, भाजपच्या मित्र पक्षाचे नेते खासदार हनुमान बेनिवाल यांनी, माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे या गेहलोत सरकार वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘गेहलोत आणि राजेंमध्ये एकमेकांना मदत करण्याचा अंतर्गत समझोता आहे. त्यामुळे अल्पमतात आलेले गेहलोत सरकार वाचवण्यासाठी राजे प्रयत्नशील आहेत.’ असा खळबळजनक आरोप त्यांनी लगावला होता.
सविस्तर वृत्त : गेहलोत सरकार वाचवण्याचे वसुंधरा राजेंचे प्रयत्न