कोलकत्ता – लॉकडाऊन आणि पावसामुळे या वर्षी चहाचे उत्पादन 40 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात चहाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या लीलावावेळी लिलावासाठी मुळातच उत्पादन कमी असल्यामुळे बोलीची किंमत जास्त आढळून आली. कोलकात्ता टी ट्रेडर्स असोसिएशन या संस्थेने सांगितले की, यावर्षी चहाचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ अपेक्षित आहे.
नेमके उत्पादन किती कमी झाले आहे असे विचारले असता या संस्थेचे महासंचालक अर्जित राहा यांनी सांगितले की, 150 दशलक्ष किलो चहाचे उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्याच्या काळात चहाचे उत्पादन 372 दशलक्ष किलो इतके झाले होते. आता ते 149 दशलक्ष टनांवर आले आहे. त्यामुळे आता झालेल्या लिलावामध्ये सर्व प्रकारच्या चहाच्या दरात किलोमागे 60 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी याचा फायदा चहा उत्पादक आणि चहावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना होणार आहे.