मुंबई – सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर आता अनेक तर्क लावले जाताना दिसत आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये असं बोललं जात आहे की, त्यानं गटबाजी आणि राजकारणामुळं सुसाईड केलं आहे. सध्या या घटनेचे सोशल मीडियावर चांगलेच युजर्सद्वारे पडसाद दिसून येत आहे. यातच अभिनेता साहिल खान यानेही बॉलीवूडच्या गटबाजी आणि राजकारणावर सोशल माध्यमांमध्ये खुलासा केला आहे.
साहिल खानने पोस्ट केले आहे की,’ ते मला चित्रपटातून काढून टाकायला लागले, नाव मोठं व दर्शन खोटं. ओळखलं का तुम्ही? आता मला त्यांचा काहीच फरक पडत नाही. सुशांत सिंग राजपूतने त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला आहे. यावरून समजतं की ही लोकं नव्या चेहऱ्यांना किती घाबरतात. 20 वर्षाच जॉन अब्राहम सोडला तर कोणीच नवीन इंडस्ट्रीमध्ये स्टार नाही झाला. कारण कोणी येऊच देत नाही नवीन लोकांना. फक्त स्टार्सच्या मुलांनाच काम मिळतं.’ अशा पोस्ट साहीलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने स्टारडस्ट या मासिकावर सलमान खान व शाहरुख खानसोबत छापलेला त्याचा फोटोही शेअर केला आहे.’