येरवडा – निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राला धडकले असून अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच पुण्यातील विमानतळ रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर एका चालत्या चारचाकी वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चारचाकी वाहनात दोन जण होते.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना जाणवणार आहे.