औरंगाबाद- औरंगाबादमध्ये दिवसभरात 62 कोरोना पाॅसिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने शहरात चिंतेचंं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचमुळे कोरोनाचा विळखा घट्ट होण्याची शक्यता आहे.
यामध्ये 34 पुरूष आणि 28 महिलांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 749 झाली आहे. तर घाटीमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आतापर्यंत 20 मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. मिनी घाटीमध्ये आज 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला, त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.
दरम्यान, सध्या मिनी घाटीत 85 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. काहीचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुऴे नवा आकडा काय असेल, यावर जिल्ह्याचं लक्ष आहे.