केरळ : देशात केरळमध्ये सर्वात आधी करोनाने शिरकाव केलेला असताना केरळमधून तो हद्दपार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे करोनाविरोधात केरळ पॅटर्न यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात केरळ सरकारने केलेल्या उपाययोजना चांगल्याच प्रभावी ठरल्या आहेत. केरळमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
विशेष म्हणजे 499 पैकी 465 जण ठणठणीत बरे होऊन पुन्हा घरी परतले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोनाविषयीच्या स्थितीची माहिती दिली. विजयन म्हणाले, केरळमध्ये एकही नवीन करोनाग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. त्याचबरोबर राज्यात 499 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी फक्त 34 जणच सध्या उपचार घेत असून तब्बल 465 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.