सांगली (प्रतिनिधी) – खेराडे वांगी येथे संस्था क्वारंटाइन केलेल्या ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मुंबई येथे मृत्यू झालेल्या 35 वर्षीय व्यक्तीचे खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते .अंत्यसंस्कारानंतर ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर प्रशासनाने त्या व्यक्तीशी संबंधित ३० व्यक्तींना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवले होते. या व्यक्तींचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.