मुंबई : करोना व्हायरसच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यांना 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण व प्रवास भत्ताध्ये 1000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नुकताच आदेश जारी केला आहे. याबाबत भाजप अध्यक्ष लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले होते. सध्याच्या कठीण परिस्थितीत वैद्यकीय व आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पोलीस, विविध अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यांच्यासमवेत, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा कर्मचारीदेखील करोनाबाधित विविध रुग्णालये आणि भागात त्यांची सेवा पूर्ण जबाबदारीने पुरवित आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 50 लाख रुपयांच्या विमा योजनेचा लाभ आणि प्रवास भत्ता वाढवून देण्याची घोषणा करावी, अशी मागणी पत्रात केली होती. याची दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार, कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षकाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमा संरक्षणच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीमार्फत मृतांच्या कुटूंबाला ही विमा रक्कम देण्यात येणार आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा कर्मचा-यांचा प्रवास भत्तामध्ये देखील एक हजार रुपयांनी वाढ करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.