मुंबई: राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सरख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही. त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्यांना घाला. असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी आज कोरोना संसर्गाविषयी व त्या संदर्भात चालू असलेल्या घटनांसंदर्भात महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून पत्रकार परिषद घेतली. दरम्यान त्यांनी मकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला?, असे म्हटले होते.
भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. लॉकडाऊन हे थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे, असे राज टाकणारे यांनी म्हटले होते. दरम्यान आज रामदास आठवले यांनी त्यावर प्रितिक्रिया दिली.
राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सरख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करीत नाही त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्यांना घाला . pic.twitter.com/Kz1DECnqJq
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 5, 2020