केडगाव -अवकाळीच्या भितीमुळे केडगाव (ता. दौंड) परिसरात शेतीच्या कामांना वेग आला आहे. मागील चार दिवसांपासून केडगाव परिसरात वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळीचे संकट उभे राहिले आहे.
काही ठिकाणी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेला गहू आणि हरभरा पिकांच्या मळणीची कामे वेगाने सुरू आहेत.
मळणी झालेला गहू पावसामुळे पांढरा पडला आहे. त्यामुळे बाजारभाव कमी मिळून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.