कोरोना या विषाणूचे नाव मागील अनेक दिवसांपासून आपल्या कानावर पडत आहे. अशाप्रकारे एखादा संसर्ग जगभरात पसरणे आणि त्याची हजारो लोकांना लागण होणे हे नवीन नाही. पण कोणताही संसर्गजन्य आजार वेगाने पसरतो आणि त्यामुळे नकळत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
अशाप्रकारच्या आजारांची भीती वाटणे स्वाभाविक असले तरीही योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून दूर राहणे शक्य होऊ शकते. संसर्गजन्य आजार पसरू नयेत यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंब, समाज यांमध्ये हा आजार वेगाने पसरत नाही. पाहूया अशावेळी नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
श्रसंसर्गजन्य आजार हे एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतात, त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप अशा समस्या असतील तर शक्यतो घराबाहेर न पडता योग्य ते औषधोपचार घेऊन पूर्ण बरे झाल्यानंतरच घराबाहेर पडावे.
श्रविषाणूंना आपला फैलाव करण्यासाठी कोणतेही माध्यम पुरते त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. यामध्ये हात, तोंड योग्य पद्धतीने धुणे, धुतलेले कपडे वापरणे, आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेवणे इत्यादी.
श्रसंसर्गजन्य आजाराची साथ आली असेल तर विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून कोमट पाणी पिणे, बाहेरचे न खाणे, आईस्क्रीम, कोलिंड्रक न घेणे, ताजे अन्न खाणे ही आहाराबाबतची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते.
श्ररोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस, आवळा, लिंबू, फळे, पालेभाज्या यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश ठेवल्यास निश्चितच फायदा होतो.
श्रविषाणू हे आकाराने अतिशय लहान असल्याने ते साधारणपणे दिसू शकत नाहीत. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत आपण राहतो ते घर, कार्यालयातील बसण्याची जागा, दुचाकी, अशा नियमित वावराची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत.
या सफाईसाठी चांगल्या क्लिंझरचा वापर केल्यास उपयुक्त ठरतो.
श्रया काळात लहान मुले, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक व ज्यांना जुने आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने कुटुंबातील सदस्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.फ