पर्यावरण संवर्धन, वृक्षसंगोपन, कचरा व्यवस्थापन, प्राणायाम कार्यशाळा, पाणीप्रश्न, उर्जा संवर्धन, महिला सक्षमीकरण अशा विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या सौ. गीता राजन मामणिया म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व. इनरव्हील क्लब, जैन सोशल ग्रूप, भारतीय जैन संघटना अशा संस्थांच्या माध्यमातून सातत्याने लोकांसाठी काम करण्याचा ध्यास घेऊन गीता मामणिया कार्यरत आहेत.
महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तरुण कार्यकर्त्या झटत आहेत. समाज आणि समाजाविषयीची तळमळ या व्यक्तीस आहे, अत्यंत अभ्यासू, गरजूंच्या मदतीला धावून जाणारी, बोलकी, उत्तम वाक्चातुर्य, सदा हसतमुख, विकासाची दृष्ठी असणारी, स्त्रीशक्तीवर दुर्दम्य, दृढ असा विश्वास असणारी ही व्यक्ती आहे, वैचारिक दिशा, वैचारिक बैठकीबरोबरच परंपरा आणि आधुनिक विचारांचा मेळ, त्यांच्या ठायी दिसून येतो, तुम्ही यशाच्या पाठीमागे न लागता यश तुमच्या पाठीमागे येईल, असे काम करावे, यावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. अत्यंत कमी वयात राजकारणाची असलेली समृद्धीताईंची आवड इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
सासरे कै. विनायक गोरे यांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय प्रवेश करून राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकारणाबरोबर समाजकारणाची आवड असल्याने वाई शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. समृद्धी दिगंबर गोरे राजकारणाच्या पटलावर आपले वेगळे स्थान मिळवू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही उपक्रमात नेहमीच हिरिरीने सहभाग घेऊन त्या कार्यक्रमात आघाडीवर राहून आपले वेगळे नेतृत्व नावारूपाला यऊ लागल्या आहेत. या उच्चशिक्षित महिलेने राजकारणात काही करून दाखविण्याची जिद्द बाळगली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे नेतृत्तव विकसित होईल, यात शंका नाही.
समृध्दीताई मुळच्या पुण्याच्या. लहानपणापासून सामाजिक तळमळ असल्याने त्यांनी अतिशय कमी वयात संस्कार भारतीचे धडे गिरविले आहेत. माहेरी राजकारणात न रमणाऱ्या समृध्दीताई सासरी मात्र सासऱ्यांच्या नंतर भारतीय जनता पक्षात सक्रिय होत सासऱ्यांनी सुरु केलेले बंडू गोरे भोजनालय अतिशय व्यवस्थितपणे चालवीत आहेत. बंडू गोरे भोजनालयाची 72 वर्षांची परंपरा त्यांनी चालू ठेवली असून आजही पुणे, मुंबईचे पर्यटक वाईत आल्यावर या भोजनालयात आवर्जून जेवणाचा आस्वाद घेतात.
चित्रपटसृष्ठीतील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन वाई परिसरात शुटींग करीत असल्यास फक्त बंडू गोरे भोजनालयातच जेवणाचा आस्वाद घेते. या भोजनालयातील तुपाची जिलबी, मटार करंजी, उकडीचे मोदक आजही लोक रांगा लावून खरेदी करतात. ते सर्व पदार्थ स्वतः समृद्धीताई बनवितात. त्याबरोबर महिलांचे संघटन करून हळदी- कुंकू, पक्षासाठी आंदोलने, निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत प्रचार करणे, यांसारख्या उपक्रमात त्या सहभागी होतात. गृहिणी, ते यशस्वी राजकारणी म्हणून अतिशय कमी कालावधीत समृद्धी गोरे हे नाव भारतीय जनता पक्षात अतिशय आदराने घेतले जाणारे नाव आहे.
पुण्यातील शनिवार वाड्याजवळील एच. व्ही. देसाई कॉलेजमध्ये त्यांनी कॉमर्सची पदवी घेवून राजकारणाबरोबर व्यवसायातसुध्दा यशस्वी होवून पाच माणसांचे कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळले आहे, सासऱ्यांचे राजकारणातील नाव मागे पडू न देता त्यांचा भोजनालयाचा व्यवसायसुध्दा अतिशय खंबीरपणे त्यांचे पतिराज दिगंबर यांच्या पाठिंब्याने सांभाळला आहे. राजकारणाविषयी समृद्धीताई म्हणतात, “राजकारणात पद, खुर्ची यापेक्षा महिलांचा विकास हेच ध्येयधोरण ठेवणे आज काळाची गरज आहे.’
समाजात अनेक पिडीत महिला आहेत, त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेणार असून त्यासाठी पक्षातील श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्या सांगतात. माझी राजकारणात फार मोठी राजकीय महत्वकांक्षा नाही, पण राजकारण, समाजकारण, सहकारात मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग महिलांसाठी करावयाचा आहे. वाई शहरातील मासळी बाजार, उघडी गटारे, रस्ते दुरुस्ती या प्रश्नांवर पालिकेत सत्ता असतानाही आवाज उठविणाऱ्या त्या महिला पदाधिकारी आहेत. त्यांच्या मते महिला दिन हा एक दिवसांसाठी साजरा न करता संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येऊन महिला सबलीकरणाला प्राधान्य द्यावे, अशीही त्यांची ठोस भूमिका असते.