तेहरान/नवी दिल्ली : दिल्लीत अलीकडे झालेल्या हिंसाचारावरून इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांनी भारताला इस्लामिक जगतातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली आहे. अतिरेकी हिंदुंचा बंदोबस्त करून मुस्लीमांचे सामुहिक हत्याकांड थांबवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतात होत असलेल्या मुस्लिमांच्या हत्यांमुळे मुस्लीम जगताला दु:ख होत आहे. भारत सरकारने अतिरकी हिंदूंना आणि त्यांच्या पक्षाला रोखावे. इस्लामी जगतापासून बहिष्कृत व्हायचे नसेल तर मुस्लिमांची हत्याकांडे थांबवावीत, असे त्याने म्हटले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जावद झरीफ यांनी दिल्ली हिंसाचारबाबत मत प्रदर्शीत केले होते. त्यावर भारताच्या वतीने नापसंती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसांत खोमेनी यांनी हे ट्विट केल आहे. झरीफ यांनी भारतीय मुस्लिमांच्या संघटीत हत्याकांडाच्या लाटेचा निषेध असे ट्विट केले होते. याबद्दल इराणच्या उच्चायुक्तांना बोलवून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने समज दिली होती.
गेल्या काही वर्षात भारताचे इराणशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे झरीफ यांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. अमेरिकेने इराणी तेल कंपन्यांकडून तेल विकत घेण्यावर निर्बंध लादले होते. त्यावेळीही भारत इराणकडून तेल आयात करत होता. छावहार बंदराच्या निर्मितीतही दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.