लाहोर : पाकिस्तान विरूध्द बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० ने जिंकली आहे.
Match called off due to rain 🌧️
Pakistan win the #PAKvBAN T20I series by 2-0. https://t.co/97EacybNFi pic.twitter.com/K3AtTcWpsj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 27, 2020
पाकिस्तानच्या बाबर आझमला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
Man of the series, @babarazam258 👏#PAKvBAN pic.twitter.com/513rXOQJfQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 27, 2020
मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यापूर्वीच पाऊसाला सुरूवात झाली. त्यामुळे टाॅसही होऊ शकला नाही आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत पाकिस्तानने याआधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली असल्याने तिसरा सामना रद्द झाल्याने त्यांनी २-० असा मालिकाविजय मिळवला.
Winners 🏆 #PAKvBAN pic.twitter.com/3lDCjvrMy4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 27, 2020
दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताने बांगलादेशवर ५ विकेटनी तर दुस-या सामन्यात ९ विकेटनी विजय मिळविला होता.