राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्दय़ावर साधला निशाणा
जयपुर: युवा नेते ही देशाची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे मत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. तसेच 21 व्या शतकातील भारत आपल्या युवकांना उद्ध्वस्त करीत आहे कारण तरुण पिढीला या देशासाठी जे काही करता येईल ते करण्याची परवानगी दिली जात असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
पिंक सिटीमध्ये आयोजित युवा आक्रोश रॅलीला संबोधित करणारे राहुल गांधी म्हणाले, “देशातील प्रत्येक युवक देशाची परिस्थिती जाणतो आणि ओळखतो.” प्रत्येक देशात काही ना काही भांडवल असते, कोट्यावधी तरुणांची सर्वात मोठीसंपत्ती भारतात आहे. आपल्याकडे जगातील सर्वात हुशार तरुण आहेत. भारतातील तरुण संपूर्ण जग बदलू शकतात. असा संपूर्ण जगाचा विश्वास आहे.
बेरोजगारीच्या मुद्दय़ावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर राहुल गांधींनी निशाणा साधला ते म्हणाले, एकविसाव्या शतकातील भारत आपल्या युवकांना वाया घालवत आहे.आपल्याला या देशासाठी जे करायचे आहे ते आपले सरकार आणि आमचे पंतप्रधान होऊ देत नाहीत. नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे सांगितले होते, परंतु गेल्या वर्षी एक कोटी तरुणांनी भारतात रोजगार गमावला असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी एनआरसीवर बोलतील, सीएए एनपीआरबद्दल बोलतील पण देशातील सर्वात मोठी समस्या असलेली रोजगार जे देशातील प्रत्येक कुटूंबाला अडचणीत आणते, याबद्दल आमचे पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत. यूपीए सरकारच्या काळात देशाचा जीडीपी विकास दर नऊ टक्के होता, जो आता नव्या मानकांनुसार पाच टक्क्यांवर आला आहे. जर तुम्ही आधीच्या यूपीए सरकारने ज्या पद्धतीने मोजले तर विकास दर केवळ अडीच टक्के असल्याचे राहुल गांधी म्हणाले.